एक एक तो क्षण आला, तुझ्यातला माझ्यातला
सजून गेला आसवांनी, चिंब मज भिजवून गेला
झरुनी गेल्या क्षणसरीनी अजुन ओला मी सखे
का असे झाले मला ते सुख सखे ग पारखे
कोरडी झालीस तू तरी अजुनी मी ओलवला
बेगडी दुनियेत माझ्या भावनांचा खून झाला
वेदनांचा माझिया गे ना कुणाला भार झाला
जाणवे तो सोनचाफा त्या तुझ्या श्वासातला
वेगळी व्याकुळता ही आगळी आतुरता
तोच मी अन तीच तू तरी का सुरांना आर्तता
जो दिला तू अर्थ त्यांना तोच मी स्वीकारला